नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेसला असल्याने दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातही विजयोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, तरीही काँग्रेसला विजयाची खात्री आहे. विजय साजरा करण्यासाठी काँग्रेस