केरळमध्ये निपाह विषाणूने धुमाकूळ घातला असून, तेथे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. निपाह व्हायरस वटवाघूळ आणि डुक्कर यासारख्या प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
निपाह विषाणूला रोखण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. हा विषाणू थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवरच हल्ला करतो. त्यामुळे संक्रमित रुग्ण कोमात जाऊ शकतात.
विषाणूजन्य ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे.