![Mamata Banerjee](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F05%2Fmamta-banregi.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत तृणमूलकाँग्रेसने आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ४२ मतदारसंघांपैकी तब्बल २९ जागांवर तृणमूलने आघाडी घेतली आहे. भाजप १२ तर काँग्रेस १जागांवर आघाडीवर आहे. सीपीआयएम एका जागेवर आघाडीवर आहे.
२८ मतदारसंघांमध्ये निर्णायक आघाडी घेतल्यानंतर तृणमूलच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकल्या, तर टीएमसीने 22 जागा जिंकल्या हाेत्या.