

pakistan started firing on ib india gave a befitting reply
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कडक कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या सैन्याकडून आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार केला जात आहे.
या आधी पाकिस्तानी सैन्याने पाच दिवस नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. मंगळवार-बुधवारच्या रात्री पाकिस्तानी चौक्यांकडून गोळीबार केला जात आहे. मात्र या गोळीबाराला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.
पाकिस्तानी सैन्याने केलेल्या युद्धबंदी उल्लंघणाने LOC च्या सेक्टरमध्ये हालचाली गतीमान झाल्या आहेत. भारतीय सैन्याचे या ठिकाणच्या स्थितीवर बारीक लक्ष आहे. सीमावर्ती भागात ऑपरेशनल अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आहे आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेत आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेवर तणाव वाढतच चालला आहे.
पाकिस्तानकडून गेल्या सहा दिवसांपासून युद्धबंदीचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात आहे. मात्र अजा बुधवार पाकिस्तानी सैन्याने जम्मूच्या परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करून स्थिती आणखीने बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे.
२९-३० एप्रिलच्या रात्री पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरवर नियंत्रण रेषेपलीकडे गोळीबार केला. भारतीय लष्कराने अजुनही अर्टिलरी गन किंवा एअर डिफेंस गनचा वापर केलेला नाही, कारण पाकिस्तानकडून छोट्या शस्त्रांमधून गोळीबार केला जात आहे.
या शिवाय बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ परगवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडेही पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांकडून बिना उकसवता गोळीबार होत असल्याची माहिती समोर येत आहे. यावर भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला आहे.
पाकिस्तानची परागवाल सेक्टरमध्ये सक्रियता ही अधिक दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएफची तैनाती वाढवण्यात आली आहे. तसेच येथील चौक्यांना सतर्क करण्यात आले आहे.