पुढारी ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सून परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. गुरूवार १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान मान्सून देशातून माघार घेईल, असे भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले असल्याचे वृत्त 'द हिंदू'ने दिले आहे.
सामान्यतः नैऋत्य मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. तो 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत भारतातून पूर्णपणे माघारी फिरतो. परंतु यंदा "आठवड्याच्या उत्तरार्धात (सप्टेंबर 19-25) नैऋत्य मान्सून वायव्य भारतातील काही भागांतून माघार घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे," असेही IMD ने म्हटले आहे.
1 जूनपासून, चार महिन्यांचा मान्सून हंगामात देशात 836.7 मिमी पाऊस पडतो दरम्यान यंदा तो सामान्य 772.5 मिमी पावसापेक्षा आठ टक्के जास्त आहे. नैऋत्य मान्सून 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान देशातून माघार घेईल, असे भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले.
नैऋत्य मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. तो 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून मागे हटतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो. यंदाच्या वर्षी मान्सूनचा भारतातील हा परतीचा प्रवास १९ सप्टेंबारपासून सुरू होणार आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा 16 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर इतर तीन झोन - वायव्य, मध्य आणि दक्षिण भारतात अनुक्रमे 4 टक्के, 19 टक्के आणि 25 टक्के जास्त पावसाची यंदा नोंद झाली आहे.