नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील मशिदींवरील भाेंगे काढून टाकावेत, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केंद्रीय गृह मंत्रालयास पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी मनसेचे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे.
मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारने मशिदींवरील भाेंगे हे 3 मे पर्यंत बंद करावेत. अन्यथा स्पीकरमध्ये हनुमान चालीसा वाजवू, असे म्हटले हाेते. हा सामाजिक प्रश्न आहे, धार्मिक नाही. आम्ही या प्रकरणात मागे हटणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, असेही त्यांनी स्पष्ट केले हाेते.
मी पंतप्रधान मोदींना मुस्लिम झोपडपट्टीतील मदरशांवर छापे टाकण्याचे आवाहन करतो. या झोपड्यांमध्ये पाकिस्तानी समर्थक राहत आहेत. मुंबई पोलिसांना माहित आहे की तिथे काय चालले आहे, आमचे आमदार त्यांचा वापर व्होटबँकेसाठी करत आहेत, अशा लोकांकडे आधार कार्डही नाही, पण ते लाेक आमदार होतात, असा आराेपही त्यांनी या वेळी केला हाेता.
हेही वाचा