Mallikarjun Kharge|सत्तेच्या हव्यासापोटी भाजप कोणत्याही थराला जाईल ; मतदारयादीतून जिवंत माणसं 'गायब' करून मतांवर दरोडा?

बिहारमध्ये 'एसआयआर'च्या नावाखाली विरोधकांची मते कापली, खर्गेंचा भाजपवर हल्लाबाेल
Mallikarjun Kharge
मल्लिकार्जुन खर्गेंचा भाजपवर हल्लाबाेलPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: सत्ताधारी भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाईल, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी केला. देशभरामधील निवडणुकांमध्ये अनेक अनियमितता समोर येत असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी आरोप केला की सत्ताधारी भाजप सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही थराला अनैतिकतेला जाण्यास तयार आहे आणि देशभरात निवडणुकांमध्ये अनेक "अनियमितता" समोर येत आहेत याचा पुनरुच्चार केला. इंदिरा भवन काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी आरोप केला की, बिहार मतदार यादीच्या विशेष पडताळणी म्हणजेच एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली विरोधकांची मते उघडपणे कापली जात आहेत. तर जिवंत लोकांना मृत घोषित केले जात आहे.

Mallikarjun Kharge
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्यात सावरकर, डांगेंचा हात : मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, ६५ लाख लोकांची मते कापली जाण्यावर भाजपला कोणताही आक्षेप नाही. यावरून हे दिसून येते की एसआयआरचा फायदा कोणाला झाला. ही निवडणूक जिंकण्याची लढाई नाही तर भारताची लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आहे, असे खर्गे यांनी बिहार मतदार यादीच्या सुधारणांना काँग्रेसच्या विरोधाचा संदर्भ देत म्हटले. सत्ताधारी पक्ष सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता उघडकीस येत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, ज्यांनी लोकांचा आवाज ऐकला आणि निवडणूक आयोगाला मतदार यादी सार्वजनिक करण्यास सांगितले, असे ते म्हणाले.

केंद्रीय तपास संस्थांचा विरोधकांविरोधात उघडपणे वापर
काँग्रेस अध्यक्षांनी दावा केला की, ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास संस्थांचा वापर विरोधी पक्षांच्या विरोधात राजकीय हेतूंसाठी इतक्या उघडपणे केला गेला आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला त्यांना आरसा दाखवावा लागला.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर निशाणा साधला. ते म्हणाले की, एकेकाळी आपण सर्व विकसनशील देशांचा आवाज होतो. पण आज आपले स्वतःचे कोणीही नाही, ना शेजारी ना दूरचे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांनी या देशासाठी पाहिलेले स्वप्न आज आपल्यापासून दूर जात आहे. खर्गे म्हणाले की, भारतीय लोकशाहीचा पाया निष्पक्ष निवडणुका आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ जून १९४९ रोजी संविधान सभेत म्हटले होते की, मताधिकार ही लोकशाहीतील सर्वात मूलभूत गोष्टींपैकी एक आहे. मतदारयादीत समाविष्ट होण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला केवळ पूर्वग्रहामुळे वगळले जाऊ नये.

खर्गे म्हणाले की, राहुल गांधींनी आकडेवारीवरून हे सिद्ध केले आहे की लोकसभा निवडणूक हेराफेरीने कशी जिंकली गेली. आता असेच पुरावे अनेक जागांवर समोर येत आहेत.

''एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य''

स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या सर्व महामानवांना त्यांनी नमन केले. स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर, भारताला आपले संविधान मिळाले. ज्याची तुलना कदाचित जगातील इतर कोणत्याही संविधानिक दस्तऐवजाशी करता येणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांच्या दीर्घ प्रवासात, काँग्रेस सरकारांनी आणि आपल्या दूरदर्शी नेत्यांनी एका मजबूत भारताचा पाया रचला, असे ते म्हणाले. संविधान सर्वोच्च ठेवून, लोकशाहीच्या निर्मितीमध्ये लोकांना समान स्थान देण्यात आले. श्रीमंत आणि गरीब, राजा आणि प्रजा, पुरुष आणि महिला, सर्वांना समान अधिकारानुसार 'एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य', देण्यात आले" असे ते म्हणाले.

Mallikarjun Kharge
देशात तातडीने जातीनिहाय जनगणनेची गरज : मल्लिकार्जुन खर्गे

महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा बारकाईने अभ्यास सुरू

काँग्रेस पक्षाला सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती परंतु एका मतदारसंघात भाजपच्या आघाडीने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांबद्दलही आम्हाला अशीच भीती आहे. पक्ष अशा जागांचा बारकाईने अभ्यास करत आहे. वेळ आल्यावर ते लोकांसमोर मांडले जाईल. देशभरातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी त्यांच्या बूथची मतदार यादी मिळवावी आणि ती बारकाईने तपासावी, असे खर्गे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news