Maharshtra-Karnataka Seema Prashn : ‘सीमा प्रश्नावर घटनात्मक मार्गानेच तोडगा निघू शकतो’

Maharshtra-Karnataka Seema Prashn : ‘सीमा प्रश्नावर घटनात्मक मार्गानेच तोडगा निघू शकतो’
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सीमा प्रश्नावर घटनात्मक मार्गानेच तोडगा निघू शकतो, असे पत्र केंद्र सरकारने महाराष्ट्र एकीकरणच्या युवा समितीला पाठवले आहे.

युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पत्र पाठवून सीमा प्रश्नाची तत्काळ सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या पत्राची दखल घेत पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने उत्तर दिले आहे. या उत्तरात म्हटले आहे की, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे. या वादावर केवळ घटनात्मक मार्गानेच तोडगा निघू शकतो.

संबंधित बातम्या : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news