IndiGo Chaos | सर्व प्रवाशांच्या तिकिटाची रक्कम विलंब न करता परतफेड करा, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे इंडिगोला निर्देश 

भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याचे विमान कंपन्यांना निर्देश
IndiGo Chaos
IndiGo Chaos | सर्व प्रवाशांच्या तिकिटाची रक्कम विलंब न करता परतफेड करा,
Published on
Updated on

नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला सर्व प्रलंबित प्रवाशांच्या तिकिटाची रक्कम विलंब न करता त्वरित परतफेड करण्याचे निर्देश दिले. मंत्रालयाने सर्व रद्द केलेल्या किंवा विस्कळीत उड्डाणांसाठी परतफेड प्रक्रिया रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:०० वाजेपर्यंत पूर्णपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याबरोबरच सद्यपरिस्थितीचा फायदा घेऊन आगाऊ भाडे आकारणाऱ्या विमान कंपन्यांच्या संधिसाधूपणाला आळा घालण्यासाठी केंद्राने निर्देश जारी केले. भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना सांगितले आहे. 

परतफेड प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा पालन न केल्यास त्वरित नियामक कारवाई केली जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच इंडिगोला परतफेड सुविधा कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

IndiGo Chaos
IndiGo Chaos : ५०० किमी अंतरासाठी विमान प्रवास ७,५०० रुपयांपर्यंत, 'इंडिगो'च्या गोंधळामुळे केंद्राने निश्‍चित केला दर

इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत स्वयंचलित परतफेड प्रणाली सक्रिय ठेवण्याचे निर्देश मंत्रालयाने कंपनीला दिले. मंत्रालयाने इंडिगोला पुढील ४८ तासांच्या आत रद्द झाल्यामुळे किंवा विलंब झाल्यामुळे प्रवाशांचे सर्व सामान शोधून प्रवाशांच्या निवासस्थानावर किंवा पत्त्यावर पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. विमान कंपन्यांना ट्रॅकिंग आणि डिलिव्हरीच्या वेळेबाबत प्रवाशांशी स्पष्ट संवाद राखण्यास आणि विद्यमान प्रवासी हक्क नियमांनुसार आवश्यक असल्यास भरपाई देण्यास सांगण्यात आले आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालय सर्वांच्या संपर्कात

या व्यत्ययाच्या काळात प्रवाशांचे हक्क पूर्णपणे संरक्षित केले जातील याची खात्री करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय विमान कंपन्या, विमानतळे, सुरक्षा संस्था आणि सर्व भागधारकांशी सतत समन्वय साधत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण आणि तातडीच्या प्रवासाची आवश्यकता असलेल्या सर्वांसाठी योग्य सुविधा हमी देण्यासाठी देखरेखीच्या यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आल्या असल्याचे मंत्रालयाने म्हटले. लवकरात लवकर संपूर्ण परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले.

IndiGo Chaos
Indigo Flights Cancelled | दिल्लीहून इंडिगोची अनेक विमान उड्डाणे रद्द, खासदारांसह अनेक प्रवाशांना फटका: मुंबई विमानाचा दर ६६ हजार रुपये

विमान कंपन्यांच्या संधिसाधूपणाला आळा घालण्यासाठी निर्देश जारी 

सद्यपरिस्थितीचा फायदा घेऊन काही विमान कंपन्यांकडून आगाऊ विमान भाडे आकारले जात आहे. ही चिंतेची बाब असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले. याची गंभीर दखल घेतली असून कोणत्याही प्रकारच्या संधीसाधूपणाला आळा घालण्यासाठी मंत्रालयाने सर्व प्रभावित मार्गांवर वाजवी भाडे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या नियामक अधिकारांचा वापर केला आहे. सर्व विमान कंपन्यांना अधिकृत निर्देश जारी करण्यात आले आहेत. ज्यात आता निर्धारित केलेल्या भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत ही मर्यादा लागू राहील, असे मंत्रालयाने म्हटले. मंत्रालय रिअल-टाइम डेटा, विमान कंपन्या आणि ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मशी सक्रिय समन्वय साधून भाडे पातळीचे बारकाईने निरीक्षण करत राहणार आहे. भाडे मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्वरित कारवाई केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news