Unmarried Youth: भारतात 'सिंगल' तरुणांची संख्या वाढली; प्रत्येक चारपैकी एक तरुण अजूनही अविवाहित, NSOचा धक्कादायक अहवाल

India Unmarried Youth Report: राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) 'Youth in India' अहवालानुसार, भारतातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील 23 टक्के तरुण अजूनही अविवाहित आहेत.
India Unmarried Youth Report
India Unmarried Youth ReportPudhari
Published on
Updated on

India Unmarried Youth Report: भारतात लग्नाचे वय सातत्याने वाढत आहे. उच्च शिक्षण, करिअरला प्राधान्य, आर्थिक स्थैर्य आणि बदलती मानसिकता यामुळे देशातील अविवाहित तरुणांची संख्या गेल्या दशकात लक्षणीय वाढली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) 'यूथ इन इंडिया' अहवालानुसार, 15 ते 29 वर्षे वयोगटातील सुमारे 23 टक्के भारतीय तरुण-तरुणी अजूनही अविवाहित आहेत.

गेल्या दशकात अविवाहित तरुणांचे प्रमाण वाढले

अहवालानुसार, 2011 मध्ये 15 ते 29 वयोगटातील अविवाहित तरुणांचे प्रमाण 17.2 टक्के होते. मात्र आता ते वाढून 23 टक्क्यांवर पोहोचले आहे. यावरून भारतातील तरुणांमध्ये उशिरा विवाह करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे स्पष्ट होते.

पुरुष आणि महिलांमध्येही हा बदल दिसून येतो.

  • अविवाहित पुरुष: 2011 मध्ये 20.8% → आता 26.1%

  • अविवाहित महिला: 2011 मध्ये 13.5% → आता 19.9%

जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक अविवाहित तरुण

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला असता, जम्मू-काश्मीर येथे सर्वाधिक अविवाहित तरुण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  • एकूण अविवाहित तरुण : 29.1%

  • पुरुष : 30.1%

  • महिला : 28.1%

या बाबतीत जम्मू-काश्मीर देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

उत्तर प्रदेश आणि दिल्लीही आघाडीवर

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात 26.7 टक्के तरुण अजूनही अविवाहित आहेत. तर दिल्लीत हे प्रमाण 26.5 टक्के आहे. शहरी जीवनशैली, करिअरवर अधिक लक्ष आणि उशिरा विवाह करण्याचा वाढता कल यामुळे राजधानीत लग्नाचे सरासरी वय वाढत असल्याचे दिसते.

पंजाबमध्ये देखील 25 टक्के तरुण अविवाहित आहेत. परदेशात स्थलांतर आणि लिंग गुणोत्तरातील असमतोल ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.

केरळमध्ये अविवाहितांचे प्रमाण सर्वात कमी

देशात सर्वात कमी अविवाहित तरुण केरळमध्ये आहेत.

  • केरळ – 18.3%

  • तामिळनाडू – 20.2%

  • आंध्र प्रदेश – 20.7%

  • हिमाचल प्रदेश – 20.8%

या राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी वयात विवाह होत असल्याचे दिसून येते.

तरुण उशिरा लग्न का करत आहेत?

NSO च्या अहवालात यामागील काही महत्त्वाची कारणे नमूद करण्यात आली आहेत.

  • उच्च शिक्षणासाठी अधिक वेळ देणे

  • करिअर आणि नोकरीला प्राधान्य

  • आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतरच विवाह करण्याची मानसिकता

  • बदलती सामाजिक मूल्ये

  • वैयक्तिक स्वातंत्र्याला वाढते महत्त्व

India Unmarried Youth Report
Ram Temple Donation Row: संसद परिसरात राम मंदिरातील चोरीवर अनोखे आंदोलन; राहुल गांधींनी दान केले पैसे, व्हिडिओ व्हायरल

बालविवाहात मोठी घट

अहवालानुसार, भारतात बालविवाहाच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे.

  • 20 वर्षांपूर्वी विवाह करणाऱ्या महिलांचे प्रमाण

    • 2005-06 : 72.4%

    • आता : 52.8%

  • 15 वर्षांपूर्वी विवाह होणाऱ्या मुलींचे प्रमाण

    • पूर्वी : 11.9%

    • आता : 1.7%

यावरून मुलींचे शिक्षण आणि विवाहाबाबतची सामाजिक जाणीव वाढल्याचे दिसते.

India Unmarried Youth Report
PM Modi Video: 'मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या...'; पंतप्रधान मोदींचा भावनिक इन्स्टाग्राम व्हिडिओ, नेमकं काय म्हणाले?

लिंग गुणोत्तराचाही परिणाम

हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक असल्याने अनेक तरुणांना योग्य जोडीदार मिळण्यात अडचणी येत आहेत. अहवालानुसार, भारतात महिलांच्या तुलनेत सुमारे 4.5 कोटी पुरुष अधिक आहेत. त्यामुळे विवाहयोग्य वयातील महिलांची कमतरता निर्माण होत असून त्याचा विवाहाच्या पद्धतीवरही परिणाम होत आहे.

बदलत्या भारताचे चित्र

NSO च्या अहवालातून भारतातील तरुणांची जीवनशैली आणि प्राधान्यक्रम बदलत असल्याचे स्पष्ट दिसून येतं. शिक्षण, करिअर आणि आर्थिक सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे विवाहाचे वय पुढे जात आहे. त्याचबरोबर बालविवाहात झालेली घट आणि बदलती सामाजिक मानसिकता हीदेखील या बदलामागील महत्त्वाची कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news