नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली आहे तर मग ते प्रचार का करत आहेत, असा सवाल ईडीच्या वकिलांनी गुरुवारी (दि.30) केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना केला.
दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात केजरीवाल यांनी नियमित जामीन व अंतरिम जामीनासाठी दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरील सुनावणीदरम्यान ईडीचे वकील एस. व्ही. राजू यांनी केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. केजरीवाल वैद्यकीय आधारावर जामीन मागत असतील तर मग ते आजारी असताना निवडणूक प्रचार कसे करतात, असा सवाल ईडीच्या वकिलांनी केला. याप्रकरणी १ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.