

Assembly Election Results 2026
चेन्नई/कोलकाता/तिरुवनंतपुरम : संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही राज्यांमध्ये ऐतिहासिक सत्तांतराची वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची पिछाडीवर असून भारतीय जनता पक्षाने बहुमताकडे कूच केली आहे. तर तामिळनाडूत अभिनेता विजयच्या 'टीव्हीके' पक्षाने पहिल्याच प्रयत्नात लक्षवेधी कामगिरी करत सत्ताधारी द्रमुकला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. दुसरीकडे, डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या केरळ राज्यातील जनतेचा मानस काँग्रेसच्या हाती सत्तेची चावी देण्याचा दिसत आहे. आसाममध्ये भाजप आपली सत्ता अबाधित ठेवत असल्याचे दिसत आहे, तर पुद्दुचेरीत सत्ताधारी एनआर काँग्रेसची सत्तेकडे वाटचाल सुरू आहे.
तामिळनाडूच्य राजकारणात ५० हून अधिक वर्षांपासून द्रविड राजकारणाचा बालेकिल्ला असलेल्या आणि प्रामुख्याने द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांचे वर्चस्व असलेल्या तामिळनाडूच्या राजकारणात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या राज्यात सध्या अत्यंत चुरशीची 'त्रिकोणी लढत' पाहायला मिळत आहे. यामध्ये मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी द्रमुक पक्ष; भाजपसोबत युती असलेला त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी द्रमुक पक्ष; आणि राजकारणात नव्यानेच प्रवेश केलेला, अभिनेता-राजकारणी विजय यांचा 'तामिळगा वेट्री कझगम' (TVK) पक्ष सत्ताधारी द्रमुकला मागे टाकत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक निकालाच्या ताज्या कलानुसार, विजय यांच्या TVK पक्षाने १०० जागांचा टप्पा ओलांडला आहे; AIADMK पक्ष ७४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर एम.के. स्टॅलिन यांचा DMK पक्ष खूपच मागे राहून तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन तासांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा ओलांडत आपली भक्कम आघाडी कायम राखली आहे. 'विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण' (SIR) प्रक्रियेअंतर्गत विक्रमी संख्येने मतदारांची नावे वगळल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. यात १५ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण २९४ जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी १४८ जागांचे बहुमत आवश्यक आहे. निकालच्या पहिल्या दोन भाजप निर्णायक १५४ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस ८६ जागांवर आघाडीवर आहे.
केरळ सत्ताधारी एलडीएफ ४४ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस प्रणित युडीए ९३ जागांवर आघाडीवर आहे. येथे बहुमतासाठी ७१ जागांची आवश्यकता असून केरळमध्ये डाव्यांची वाटचाल पराभवाकडे असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री विजयन हे धर्मडोम मतदारसंघात पिछाडीवर आहेत.
आसाम विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलानुसार, सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'ने (NDA) बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप सध्या ९९ जागांवर आघाडीवर असून येथे बहमुतासाठी ६४ जागांची गरज आहे. हे राज्यात पुन्हा सत्तेवर परतण्याचे एक प्रबळ संकेत मानले जात आहेत. हे प्राथमिक कल असे दर्शवतात की, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत भाजप आहे. या कलानुरूप, हिमंता बिस्वा सरमा यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यात पुन्हा एकदा यश मिळवले आहे.
केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीत, सुरुवातीचे कल भाजप आघाडीला आघाडी मिळत असल्याचे दर्शवत आहेत. भाजप आघाडी सध्या २२ जागांवर आघाडीवर आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा १६ इतका आहे; या कलांनुसार, भाजप आघाडीने हा आकडा ओलांडला आहे.