1980 च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणार्या दहशतवादाने पंजाब पोळून निघाला होता.
खलिस्तानवाद्यांकडून हिंदूंची हत्याकांडे नित्याची बनली होती.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1984 मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात लष्कर घालून दहशतवाद्यांचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा खात्मा केला होता.
अमृतपाल हा याच भिंद्रनवालेचा भक्त आहे. भिंद्रनवालेच्याच रोडे गावातील भिंद्रनवालेच्याच गुरुद्वारा साहिबमध्ये अमृतपाल लपलेला होता. त्याला आता दिब्रुगड कारागृहात ठेवले आहे.
दिब्रुगड कारागृहात बाकीचे साथीदारही आहेत. फुटीरवादाचा हा आजार बळावू नये म्हणून सर्वांवर रासुकाअंतर्गत कारवाई केलेली आहेच, त्यासह दिब्रुगड कारागृहात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
व्यवस्था, तजवीज अशी…
अमृतपाल आणि सर्व साथीदारांना वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवले आहे.
आयबी, रॉ आणि अन्य गुप्तचर यंत्रणांचे चमू दिब्रुगडमध्ये अमृतपालवर नजर ठेवतील.