९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून

पंतप्रधान करणार उद्घाटन, ७१ वर्षांनंतर दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन
Marathi sahitya Sammelan
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून Pudhari photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.२१) ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. मराठी साहित्याची समकालीन प्रासंगिकता आणि भूमिका समोर आणण्याच्या उद्देशाने ७१ वर्षांनंतर, दिल्लीत हे तीन दिवसीय साहित्य संमेलन आयोजित केले गेले आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डाॅ. तारा भवाळकर या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहेत.

भारताच्या समृद्ध संस्कृती अन् वारशाचा उत्सव साजरा करणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी साडेचार वाजता विज्ञान भवन येथे या साहित्य संमेलनाला संबोधित करतील आणि त्याचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान चालेल आणि भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे उत्सव साजरा करण्याचे आयोजन केले आहे.

साहित्यकृतींवरील प्रभाव यासारख्या विषयांवर चर्चा

या परिषदेत पॅनेल चर्चा, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसिद्ध साहित्यिकांशी संवादात्मक सत्रे असतील, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. भाषा जतन, भाषांतर आणि साहित्यकृतींवर डिजिटायझेशनचा परिणाम यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल.

Marathi sahitya Sammelan
शुक्रवारपासून ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

प्रख्यात विद्वान, लेखक, कवी आणि साहित्य प्रेमी एकत्र येणार

या कार्यक्रमात पुणे ते दिल्ली असा एक प्रतीकात्मक साहित्यिक रेल्वे प्रवास देखील समाविष्ट आहे, यामध्ये २,६०० हून अधिक कविता सादरीकरणे, ५० पुस्तकांचे प्रकाशन आणि १०० पुस्तकांचे स्टॉल असतील. देशभरातील नामांकित विद्वान, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी यामध्ये सहभागी होतील.

साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींकडे साहित्यिकांचे चहापान

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिकांच्या चहापानाचा कार्यक्रम उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी पार पडला. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. याप्रसंगी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीराम पवार आणि साहित्यिक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संमेलनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.

मराठीबद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेम : उपराष्ट्रपती

यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, सर्व राज्यांच्या भाषा टिकल्या पाहिजेत. नव्या पिढीने त्या चांगल्या पद्धतीने बोलल्या पाहिजेत. कुठलीही भाषा ही त्या त्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मराठीबद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेम आहे, अशा भावना यावेळी उपराष्ट्रपतींनी व्यक्त केल्या. आजवर झालेली साहित्य संमेलने, मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या आणि अशा विविध विषयांवर कर्ज झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news