नवी दिल्ली : राहुल गांधींना 'नीट' विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणेघेणे नसून, त्यांना फक्त राजकारण करायचे आहे, असा पलटवार भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि शहजाद पूनावाला यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
त्रिवेदी म्हणाले की, गुजरात आणि मध्य प्रदेश हे पेपरफुटीचे केंद्र असल्याचा राहुल गांधी यांनी केलेला आरोप हा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक विरोधातून केलेला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातच्या तरुणांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे?पूनावाला?म्हणाले.