काँगेस प्रवक्त्यांचा इंडिया टीव्हीवरील चर्चेवर बहिष्कार

File Photo
File Photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस यापुढे आपल्या प्रवक्त्यांना 'इंडिया टीव्ही' या वृत्तवाहिनीवर चर्चेसाठी पाठवणार नसल्याची माहिती काँगेस प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी (दि.११) पत्रकारपरिषदेत दिली.

'इंडिया टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी चर्चेदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. इंडिया टीव्हीवर काँग्रेस प्रवक्ता चर्चेसाठी जाणार नसल्याची पोस्ट खेडा यांनी सोशल मिडीयावरील एक्सवर शेअर केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news