नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: काहीही झाले तरी कोणीही संविधान बदलू शकत नाही, भाजप संविधान बदलेल, असे म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी चुकीची आणि आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, या संदर्भात त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.