आसाममध्ये माफियाराज; प्रियांका गांधी-वधेरा यांचा आरोप | पुढारी

आसाममध्ये माफियाराज; प्रियांका गांधी-वधेरा यांचा आरोप

धुबरी (आसाम); वृत्तसंस्था : आसाममध्ये माफियाराज सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वधेरा यांनी बुधवारी बुधरी येथे झालेल्या प्रचारसभेत केला.

त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर गंभीर आरोप झाले, भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर सारे काही मागे पडले. देशातील सर्व संस्था, सर्व यंत्रणा आज भाजपच्या पाठीशी उभ्या आहेत. लोकशाही आणि संविधान मजबूत करण्याचे सर्व मार्ग बंद केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button