Bhojshala : भोजशाळा सर्वेक्षण उद्यापासुन सुरू होणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील धार येथील भोजशाळेचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) इंदूर येथे मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयच्या आदेशानंतर उद्या (दि. २२ मार्च) रोजी सुरू होणार आहे. (Bhojshala)
Bhojshala : काय आहे ‘भोजशाळा’ वाद?
धार येथील भोजशाळेत सरस्वती देवीची मूर्ती बसवण्याची आणि संपूर्ण संकुलाची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी करणारी याचिका इंदूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली हाेती . तसेच येथील नमाज बंद करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
इतिहास काय सांगतो?
हजार वर्षांपूर्वी धार येथे परमार घराण्याची सत्ता होती. राजा भोजने येथे 1000 ते 1055 पर्यंत राज्य केले. राजा भोज हे सरस्वती देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी 1034 मध्ये येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे नंतर ‘भोजशाळा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदूंनीही याला सरस्वती मंदिर मानले. 1305 मध्ये अलाउद्दीन खिलजीने भोजशाळा उद्ध्वस्त केल्याचे सांगितले जाते. यानंतर 1401 मध्ये, दिलावर खान गौरीने भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. १५१४ मध्ये महमूद शाह खिलजीने दुसऱ्या भागातही मशीद बांधली.1875 मध्ये येथे उत्खनन झाल्याचे मानले जाते. या उत्खननात सरस्वती देवीची मूर्ती सापडली. ब्रिटीश अधिकारी मेजर किनकेड याने ही मूर्ती इंग्लंडला नेली. सध्या ती लंडनच्या संग्रहालयात आहे. ती परत आणण्याची मागणीही हायकोर्टात दाखल याचिकेत करण्यात आली आहे.
हिंदू संघटना भोजशाळेचे वर्णन राजा भोज काळातील वास्तू म्हणून करतात आणि तिला सरस्वतीचे मंदिर मानतात. राजवंशाच्या काळात मुस्लिमांना काही काळ येथे नमाज अदा करण्याची परवानगी होती. दुसरीकडे, मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे की ते वर्षानुवर्षे येथे नमाज अदा करत आहेत. मुस्लिम त्याला भोजशाळा-कमल मौलाना मशीद म्हणतात.
धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले
1909 मध्ये, धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले. नंतर ते पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. 1935 मध्ये धार संस्थानानेच येथे शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. 1995 मध्ये येथे वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी पूजा आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली.
Bhojshala : तणावाच्या घटनांमुळे भोजशाळा चर्चेच्या केंद्रस्थानी
12 मे 1997 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी भोजशाळेत सर्वसामान्यांना येण्यास बंदी घातली. मंगळवारी पूजा करण्यासही बंदी घातली. वसंत पंचमीच्या दिवशीच नमाज आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली होती. ही बंदी 31 जुलै 1997 रोजी उठवण्यात आली. 6 फेब्रुवारी 1998 रोजी पुरातत्व विभागाने पुढील आदेश येईपर्यंत प्रवेशावर बंदी घातली. मंगळवारची पूजाही बंद झाली. 2003 मध्ये पुन्हा मंगळवारी पूजा करण्यास परवानगी देण्यात आली. बँक्वेट हॉलही पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. 2013 मध्ये वसंत पंचमी आणि शुक्रवार एकाच दिवशी पडल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. हिंदूंनी जागा सोडण्यास नकार दिला. पोलिसांनी लाठीमार केला. 2016 मध्येही असचा प्रकार घडला होता.
Madhya Pradesh | ASI (Archaeological Survey of India) survey of Bhojshala in Dhar to begin tomorrow, 22nd March, after the order of High Court, Madhya Pradesh at Indore. pic.twitter.com/T9le6PfZl3
— ANI (@ANI) March 21, 2024
हेही वाचा
- S S Rajamouli : ‘जमीन हादरली, आम्ही २८ व्या मजल्यावर होतो’, जपानमधील भूकंपात एसएस राजामौली बचावले
- Nashik Congress | लोकसभेतून काँग्रेसची गोळाबेरीज, विधानसभेसाठी मध्य मतदारसंघातून चाचपणी
- Lok Sabha elections 2024 | पक्षांत फूट, विरोधक विभागले; लोकसभेत कुणाला फायदा? काय आहे यामागील रणनिती?