‘शक्ती’कडून विरोधकांचा विनाश : पंतप्रधान मोदी

‘शक्ती’कडून विरोधकांचा विनाश : पंतप्रधान मोदी

सालेम (तामिळनाडू); वृत्तसंस्था : इंडिया आघाडीकडून जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा अवमान केला जात असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गेल्या पाच दिवसांपासून मोदी दक्षिणेकडील राज्यांच्या दौर्‍यावर आहेत. सालेममधील सभेत दिवंगत सहकार्‍यांच्या आठवणींमुळे मोदी भावुक झाले होते. के. एन. लक्ष्मण यांनी पक्षासाठी खूप मोठे योगदान दिल्याची आठवण सांगताना मोदी यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना भाजपच्या शक्तीचा बुरखा फाडण्याची गरज असल्याचे विधान मुंबईतील सभेत केले होते. (Lok Sabha elections 2024)

मोदी यांनी सोमवारी राहुल गांधी यांच्यावर यावरून निशाणा साधला होता. मंगळवारी पुन्हा शक्ती शब्दावरून मोदी यांनी इंडिया आघाडीवरच तोफ डागली. इंडिया आघाडीकडून जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा अवमान केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, हिंदू धर्मीयांची 'शक्ती'वर श्रद्धा असते. या श्रद्धेचे उच्चाटन करण्याचा चंग इंडिया आघाडीने बांधल्याचे समोर आले आहे. हिंदू धर्मात शक्ती कशाला म्हणतात, हे प्रत्येक हिंदू धर्मीयांना माहिती आहे. शक्तीचे उच्चाटन करू पाहणार्‍यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत विनाश होणार आहे. त्याची सुरुवात तामिळनाडूत होणार आहे, अशा शब्दांत मोदी यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल चढविला. (Lok Sabha elections 2024)

अन्य धर्मांचा राहुल अवमान करणार का?

काँग्रेस आणि द्रमुकचे नेते अन्य धर्मीयांविरोधात कधी भाष्य करीत नाहीत. हिंदू धर्मीयांचा अवमान करण्यासाठी मात्र ते सातत्याने उतावीळ असतात. हिंदू धर्माला शिव्या घालण्यासाठी मात्र या पक्षाचे नेते एक सेकंदही वाया घालवत नाहीत. राहुल यांच्यासह इंडिया आघाडीतील नेते अन्य धर्मांविरोधात एक शब्दही उच्चारत नाहीत, हिंदूंचा अवमान करण्यासाठी मात्र ते पुढे असतात, अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला. (Lok Sabha elections 2024)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news