ब्रेकिंग : हिमाचलचे मुख्यमंत्री सुक्खूंचा राजीनाम्याचा प्रस्ताव
पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय दिल्याचे वृत्त दैनिक ‘भास्कर’ने दिले आहे. सुक्खू यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. यापूर्वी सुक्खू यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले होते.संध्याकाळी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात नवा नेता निवडला जाऊ शकतो, असेही या वृत्तात म्हटलं आहे. दरम्याम कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे हिमाचल प्रदेशकडे रवाना झाले आहेत. आता ते नाराज काँग्रेस आमदारांशी चर्चा करणार आहेत. हिमाचल प्रदेशच्या संकटासाठी दोन निरीक्षकांपैकी एक म्हणून नियुक्त केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा हे चंदीगडहून शिमलासाठी रवाना झाले आहेत.कोणत्याही परिस्थितीमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ( Himachal Pradesh Political Crisis )
काँग्रेसचे पक्ष निरीक्षक पश्रश्रेष्ठींना करणार अहवाल सादर
हिमाचल प्रदेशमधील राजकीय संकटाबाबत ‘एएनआय’शी बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, “कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि पक्षाचे प्रभारी राजीव शुक्ला हिमाचल प्रदेशमधील नाराज काँग्रेस आमदारांचे म्हणणे ऐकून घेतील. यानंतर ते पक्षश्रेष्ठींना आपला अहवाल सादर करतील.
#WATCH | Himachal Pradesh political crisis | Congress General Secretary in-charge Communications Jairam Ramesh says, “Karnataka Deputy CM D.K. Shivakumar, former Haryana CM Bhupinder Singh Hooda and our incharge Rajeev Shukla are there. They have spoken with the Congress… pic.twitter.com/JcVdIczVIj
— ANI (@ANI) February 28, 2024
राज्यसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडी वेगावल्या
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसल्यानंतर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी आज बुधवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांचे वडील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवंगत वीरभद्र सिंह यांचा अनादर केल्याचा आरोप करत राज्यमंत्री विक्रमादित्य सिंह आज सकाळी मंत्रीपदावरून पायउतार झाले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह १५ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. (Himachal political crisis)
#WATCH | Senior Congress leader Bhupinder Singh Hooda, who has been appointed as one of the two observers for the Himachal Pradesh crisis, leaves from Chandigarh for Shimla. pic.twitter.com/N61V9ROIOt
— ANI (@ANI) February 28, 2024
काँग्रेसचे ६ आमदार भाजपच्या संपर्कात
राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. हिमाचलमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपच्या हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे दिसते. यानंतर काँग्रेसचे ६ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे कळते. काँग्रेसचे ६ आमदार आणि ३ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू सरकार अस्थिर झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेते भूपिंदर सिंह हुडा आणि डीके शिवकुमार यांना नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी पाठवले आहे. (Rajya Sabha Election 2024)
#WATCH | Himachal Pradesh LoP Jairam Thakur says “We went to meet the Governor in the morning today and I said that since Congress does not have the majority to pass the Budget in the Assembly, the Speaker will suspend BJP MLAs. Today, as soon we entered the Assembly, 15 BJP MLAs… pic.twitter.com/kaD5eAtJf9
— ANI (@ANI) February 28, 2024
राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले. विशेष म्हणजे विधानसभेत काँग्रेसकडे बहुमत असतानाही राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होट केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सत्ताधारी काँग्रेसने राज्यसभेची एकमेव जागा गमावली. काँग्रेस आमदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हिमाचल प्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ६ आमदार शिमल्याहून हरियाणाकडे रवाना झाले होते. ते भाजपच्या संपर्कात असल्याचे कळते. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्याची भाजपची योजना असल्याच्या वृत्तांमुळे हिमाचल प्रदेशात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Himachal political crisis)
भाजपच्या १५ आमदारांचे निलंबन
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह विपिन सिंह परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण ठाकूर, इंदर सिंह गांधी, दिलीप ठाकूर आदी १५ भाजप आमदारांवर आज विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. यामुळे सभागृहाचे कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले.
सरकार स्थापन करण्याची भाजपची तयारी
हिमाचल प्रदेशातील एकमेव राज्यसभेची जागा जिंकणारे भाजप नेते हर्ष महाजन यांनी बुधवारी दावा केला की, सभागृहात ‘बहुमत नसल्यामुळे’ काँग्रेसला बाजूला करुन भाजप राज्यात सरकार स्थापन करणार आहे. महाजन यांनी बुधवारी एएनआयशी बोलताना सांगितले की, काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि राज्यात सरकार बदलेल.
विधानसभेतील संख्याबळ कसे?
६८ सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे ४०, भाजपचे २५ आणि तीन अपक्ष आमदार आहेत. भाजपकडे कवेळ २५ आमदार असतानाही भाजपने राज्यसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला होता. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या आमदारांसाठी व्हीप जारी केला होता.