पुढारी ऑनलाईन डेस्क : बायकोला चारचौघात कानखाली लगावने हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळ जम्मू काश्मीर आणि लड्डाख उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने नवऱ्याच्या विरोधातील विनयभंगाचा गुन्हा रद्द केला आहे. पण जाणीवपूर्वक इजा पोहोचवण्याचा गुन्हा ग्राह्य धरण्यात आला आहे. (High court)
मेहबूब अली विरुद्ध निसार फातिमा या खटल्यात उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती रजनेश ओसवाल यांनी निकालात म्हटले आहे की या प्रकरणात कलम ३५४ नुसार गुन्हा नोंद होऊ शकणार नाही, पण कलम ३२३नुसार कारवाई होऊ शकते.
या प्रकरणात नवरा बायकोत कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू आहे. एका सुनावणीनंतर नवऱ्याने बायकोला न्यायालयाच्या आवारात कानखाली लगावली होती. त्यानंतर नवऱ्यावर कलम ३२३ आणि कलम ३५४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. नवऱ्याने या प्रकरणात उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते.
हेही वाचा