‘ईडी’च्या याचिकेवर केजरीवालांना धक्का, १७ राेजी न्‍यायालयात हजर राहण्याचे निर्देश | पुढारी

'ईडी'च्या याचिकेवर केजरीवालांना धक्का, १७ राेजी न्‍यायालयात हजर राहण्याचे निर्देश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्‍यायालयाने आज मोठा धक्का बसला दिला.  केजरीवाल यांना समन्स बजावत 17 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्‍यात आले आहेत.दिल्‍ली मद्य घोटाळा प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचवेळा समन्‍स बजावले. मात्र त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले. याप्रकरणी ‘ईडी’ने दिल्‍लीतील राऊस एव्हेन्यू न्‍यायालयात याचिका दाखल केली हाेती.

दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ‘ईडी’ने मुख्यमंत्री केजरीवाल यांना गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि यावर्षी 3 जानेवारी, 18 जानेवारी आणि 31 जानेवारी रोजी समन्स पाठवले होते. केजरीवाल यांनी पाचहड समन्सला प्रतिसाद दिला नाही. तसेच ईडीने बजावलेले समन्‍स बेकायदेशीर आहेत. भाजप हे सर्व राजकीय द्वेषातून करत आहे, असा दावा त्यांनी केला होता. केजरीवाल यांनी समन्सला उत्तर न दिल्याने ‘ईडी’ने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा ​​यांच्यासमोर तक्रार दाखल केली होती.

Back to top button