पंतप्रधानांच्या फॅक्टर्‍या कोणी कोणी पाहिल्या; राहुल गांधींचा सवाल

राहुल गांधी
राहुल गांधी

हरदा/निमच; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्यांनी मध्य प्रदेशात नव्या 500 फॅक्टर्‍या सुरू केल्या. मला सांगा या फॅक्टर्‍या कोणी-कोणी पाहिल्या आहेत, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जनतेला उद्देशून केला.

टिमरनी (हरदा) तसेच जावद (निमच) येथे राहुल गांधी यांच्या प्रचार सभा झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. निमचमधील जावद येथील सभेत राहुल गांधी म्हणाले, याआधीही मोदींनी, काळे धन जप्त करून प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकणार असल्याची एक गोष्ट सांगितली होती. आता येथे येऊन ते त्याच पद्धतीने 500 फॅक्टर्‍या सुरू केल्याचे सांगत आहेत. आम्ही 27 लाख शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले. आम्ही शेतकर्‍यांसाठी कामाला सुरुवात केलीच होती आणि भाजप तसेच बड्या उद्योगपतींनी मिळून आपले सरकारच लांबविले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news