प्रज्ञा सिंह ठाकूर, “पहाटे अजान केल्यामुळे लोकांची झोप मोडते” | पुढारी

प्रज्ञा सिंह ठाकूर, "पहाटे अजान केल्यामुळे लोकांची झोप मोडते"

भोपाळ; पुढारी ऑनलाईन : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांना वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. त्यांनी पहाटे मशिदींमध्ये होणाऱ्या अजानावर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या की, “पहाटे अजानमुळे लोकांची झोप मोड होते. रुग्णांचादेखील लोक विचार करत नाहीत आणि साधू-संताच्या साधनेत त्यांच्यामुळे भंग निर्माण होतो”, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांना केलेले आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर भोपाळ येथे वाल्मिकी समाजाच्या परिचय संमेलनात बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, “इतर समुदायाच्या प्रार्थनेवेळी मोठ्या आवाजात भजन, किर्तन करु नका असं आपल्याला सांगितलं जातं. पण हे लोक पहाटे पहाटे अजान करुन लोकांची झोप मोड करतात. पहाटे ५ वाजता अजानमुळे लोकांची झोप उडते. रुग्णांना त्रास होतो. साधू-संत पूर्जा अर्चा किंवा ध्यान साधना पहाटे सुरू असते. त्यांनाही व्यत्यय येतो. आरतीची वेळदेखील सकाळी असते आणि त्यावेळी यांचे लाऊडस्पीकर, भोंगे जोरजोरात वाजत असतात. त्याचा त्रास होतो”, असं विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे.

“आम्ही हिंदू लोक सर्वधर्म समभावाचा सन्मान करतो. पण इतर कोणता धर्म असं वागतो का?”, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. गांधी कुटुंबियावर टीका करताना म्हणाल्या की, “कुटुंबातील एका मुलाला राजकारण जमत नाही. म्हणून आता ते मुलीला घेऊन आले आहेत आणि तीही नौंटकी करत आहे”, अशीही टीका त्यांनी काॅंग्रेसवर केली आहे.

पहा व्हिडिओ : गावात दिवाळी आली आणि साजरी झाली दिवाळी…

Back to top button