पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी गोळ्या घालून ठार केले. दहशतवाद्यांना नियंत्रित रेषा ओलांडता यावी, यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी कव्हर फायरिंग केले आहे. दहशतवाद्यांचा घुसघोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरु केली होती, याबाबतची माहिती ब्रिगेडिअर पीएमएस ढिल्लन यांनी सांगितले.
ब्रिगेडियर पीएमएस ढिल्लोन म्हणाले, "तीन दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यांचे मृतदेह देखील बाहेर काढले. दरम्यान, तीसरा दहशतवादीही मारला गेला असून पाकच्या कव्हर फायरिंगमुळे त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले आहे."
दोन एके रायफल्स, एक पिस्तूल, सात हँड ग्रेनेड आणि इतर युद्धसदृश स्टोअर्ससह पाकिस्तानच्या चलनी नोटा दहशतवाद्यांजवळ मिळाल्या आहेत. दहशतवाद्यांजवळ सापडलेली सर्व शस्त्रे आणि चलनी नोट जप्त करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, भारत आणि पाकिस्तान सैन्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबविण्याचे मान्य केले होते.