INDIA नाही आता देशाचे नाव होणार भारत? भाजप नेत्यांचे संकेत आणि काँग्रेसचा आरोप
पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या विशेष अधिवेशनात घटनेतून ‘इंडिया’ हे नाव हटवले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही ट्विटमध्ये असे काही संकेत दिले आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी G20 परिषदेच्या एका कार्यक्रमात ‘भारताचे राष्ट्रपती’ असे ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिल्याचे म्हटलं केला आहे. नुकतेच सत्ताधारी भाजपच्या काही नेत्यांनीही ‘इंडिया’ हे नाव गुलामगिरीचे प्रतीक असल्याचे सांगून ते काढून टाकण्याचे आवाहन केले होते.
केंद्र सरकार ‘इंडिया’ शब्द हटविण्याचा प्रस्तावाशी संबंधित विधेयक मांडणार?
रिपोर्टनुसार , १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार ‘इंडिया’ शब्द हटवण्याच्या प्रस्तावाशी संबंधित विधेयक मांडू शकते. याशिवाय, चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणासह देशाने अलीकडेच मिळवलेल्या यशांवरही विशेष सत्रादरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच २०४७ पर्यंत भारताला ‘विकसित देश’ बनवण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात येणार असून या विषयावरही चर्चा होणार आहे.
REPUBLIC OF BHARAT – happy and proud that our civilisation is marching ahead boldly towards AMRIT KAAL
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) September 5, 2023
अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही ‘आपल्या देशाचे नाव शतकानुशतके भारत आहे’ असे सांगत इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत कालच्या पाच व्रतांवर भर देताना सांगितले होते की, एक गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता आहे. सरकारने या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. ज्यामध्ये शिक्षण धोरणातील बदलांपासून चिन्हे काढून टाकणे, गुलामगिरीशी संबंधित रस्त्यांचे आणि ठिकाणांचे नाव बदलणे, वसाहतवादी सत्तेशी संबंधित लोकांचे पुतळे हटवणे आणि प्रमुख (ऐतिहासिक) भारतीयांचे पुतळे बसवणे यांचा समावेश होता.
जयराम रमेश यांच्या दाव्याने खळबळ
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी जी २० परिषदेच्या डिनरसाठी पाठवलेले आमंत्रण ‘भारताच्या राष्ट्रपती’ ऐवजी ‘राष्ट्रपती’च्या नावाने पाठवण्यात आले आहे. त्यांनी येथे भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 चा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये देशाच्या नावाचे वर्णन केले आहे. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले आहे की, ‘भारतीय प्रजासत्ताक – आनंद आणि अभिमान आहे की आमची सभ्यता अमरत्वाकडे मोठ्या धैर्याने पुढे जात आहे.’
Mr. Modi can continue to distort history and divide India, that is Bharat, that is a Union of States. But we will not be deterred.
After all, what is the objective of INDIA parties?
It is BHARAT—Bring Harmony, Amity, Reconciliation And Trust.
Judega BHARAT
Jeetega INDIA! https://t.co/L0gsXUEEEK— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 5, 2023
#WATCH | On Congress leader Jairam Ramesh’s claim that invitations to a G20 Summit dinner at Rashtrapati Bhawan sent in the name of ‘President of Bharat’, RJD MP Manoj Jha says, “…It has just been a few weeks since we named our alliance as INDIA and BJP has started sending… pic.twitter.com/wCs5WCwRAB
— ANI (@ANI) September 5, 2023