अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वामुळे देशाच्या प्रगतीला चालना : पंतप्रधान मोदी
पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (दि.१६) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सदैव अटल’ स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. “अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामुळे देशाच्या प्रगतीला चालना मिळाली,” अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
“अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त १४० कोटी लोकांसोबत आदरांजली वाहत आहे. त्यांच्या नेतृत्वाचा भारताला खूप फायदा झाला. आपल्या देशाच्या प्रगतीला चालना देण्यात आणि विविध क्षेत्रांमध्ये २१व्या शतकात नेण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह एनडीएच्या नेत्यांनी ‘सदैव अटल’ येथे पुष्पहार अर्पण केला.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi pays floral tribute at ‘Sadaiv Atal’ memorial on former PM Atal Bihari Vajpayee’s death anniversary. pic.twitter.com/sKhGiQAY2s
— ANI (@ANI) August 16, 2023
I join the 140 crore people of India in paying homage to the remarkable Atal Ji on his Punya Tithi. India benefitted greatly from his leadership. He played a pivotal role in boosting our nation’s progress and in taking it to the 21st century in a wide range of sectors.
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2023