दिल्लीत महत्वपूर्ण ठिकाणी कलम 144 लागू
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा; स्वातंत्र्य दिन पुढील आठवड्यात साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजघाट, आयटीओ आणि लाल किल्ल्यासह इतर महत्वपूर्ण ठिकाणी पोलिसांनी जमावबंदीचे कलम 144 लागू केले आहे.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणर असून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविणार आहेत. दरम्यान 16 ऑगस्टपर्यंत हवेत उडणारे पॅरा ग्लायडर, हॅंड ग्लायडर, हाॅट एअर बलून आणि मानवरहित एरियल व्हेईकल उडविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा :