पीएम किसान अंतर्गत देय असलेल्या चौदाव्या हप्त्याचा (एप्रिल, २०२३ ते जुलै, २०२३) लाभ देशातील लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केल्याने खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदीसाठी ही रक्कम निश्चितच उपयुक्त ठरेल. तसेच कृषी उत्पादन वाढीला चालनाही मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये योजना सुरू झाल्यापासून ११०.५३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना २३७३१.८१ कोटींचा लाभ हस्तांतरीत करण्यात आला आहे.