Rajasthan Murder Case : क्रौर्याचा कळस! विवाहित प्रेयसीच्‍या पतीचा निर्घृण खून, यानंतर केले ते भयंकरच… | पुढारी

Rajasthan Murder Case : क्रौर्याचा कळस! विवाहित प्रेयसीच्‍या पतीचा निर्घृण खून, यानंतर केले ते भयंकरच...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमध्‍ये एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एका ३३ वर्षीय तरुणाचा पत्‍नीच्‍या प्रियकराने खून केला. यानंतर त्‍याने केलेल्‍या कृत्‍याने पाेलिसही हादरले आहेत. या घटनेने राजस्‍थानमधील पाली जिल्‍ह्यात खळबळ उडाली आहे. (Rajasthan Murder Case )

या प्रकरणी पाली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक गगनदीप सिंगला यांनी माध्‍यमाशी बोलताना सांगितले की, आरोपी मदन मेघवाल हा पाली जिल्ह्यातील ठाकूरदास गावचा रहिवासी आहे. याचे खून झालेल्‍या जोगेंद्र मेहवाल याच्‍या पत्नीशी अनैतिक संबंध होते. १३ जुलै मिश्रीमल मेघवाल यांनी मुलगा जोगेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. यावेळी मिश्रीमल यांनी मदन मेघवाल यांच्‍यावर संशय व्‍यक्‍त केला हाेता. त्‍या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ( Rajasthan Murder Case )

मदन मेघवाल याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्‍याने गुन्‍ह्याची कबुली दिली. मदन याने जोगेंद्र यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केल्‍याची कबुली दिली. जोगेंद्र नुकताच चित्तौडगडमधील निबाहेडा येथे गेला होता. तिथे त्‍याला खासगी नाेकरी मिळाली हाेती.  १० जुलै रोजी जोगेंद्र आपल्या गावी आला होता, मात्र त्याने पत्नीला सोबत आणले नव्‍हते. यापुढे जोगेंद्रच्या पत्नीला भेटता येणार नाही, त्‍यामुळे त्‍याच्‍या खूनचा कट मदनने रचला.

Rajasthan Murder Case : दारु पाजून काढला काटा

मदन आणि जोगेंद्र यांची ओळख होती. याचा फायदा घेत मदन याने जोगेंद्रला घेवून दारु पिण्‍यासाठी गेला. त्‍याला दारु पाजली. यानंतर निर्जनस्‍थळी नेवून जोगेंद्रच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपींनी जोगेंद्रच्या मृतदेहाचे सहा तुकडे करुन हात, पाय आणि डोके आपल्यासोबत बॅगेत नेले. त्यांनी जोगेंद्रचा उरलेला मृतदेह नाल्यात फेकून दिला.

घरासमोरील बागेतच मृतदेहाचे तुकडे पुरले, त्‍यावर आंब्‍याचे रोपही लावली

, मदन याने जोगेंद्र याच्‍या मृतदेहाचे डोके, दोन हात आणि दोन पाय घेऊन आपल्‍या घरी गेला. घरासमोरील बागेत ४-५ फूट खड्डे खाणले. या खड्ड्यांमध्‍ये मृतदेहाचे तुकडे पुरले. दुर्गंधी येवून नये म्‍हणून काही रसायनही टाकले. दुसऱ्या दिवशी त्‍यावर आंब्‍याची रोपेही लावली. यानंतर पुढील आठ दिवस तो झाडांना पाणीही घालत हाेता, अशी धक्‍कादायक माहिती तपासात समाेर आल्‍याचे पोलीस अधीक्षक गगनदीप सिंग यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

 

Back to top button