तुम्हाला मृत्यूचा खेळ मान्य आहे का?: स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल
पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या होताना दिसत आहे, लोकशाही हक्क मागणार्या लोकांची हत्या केली जात आहे. हे सारे काही तृणमूलमुळेच होत आहे. काँग्रेस पक्षाने तृणलूल काँग्रेसशी हातमिळवणी आहे. हा मृत्यूचा खेळ राहुल गांधींना मान्य आहे का?, असा सवाल करत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षाने तृणमूलशी आघाडी केल्याबद्दल त्यांनी गांधी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये माध्यमांशी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत लोकशाहीची हत्या होताना लोक पाहत आहेत. या राज्यात लोकशाहीचा हक्कासाठी लढा देणार्यांची हत्या केली जात आहे. तर दुसरीकडे गांधी कुटुंब तृणमूलशी हातमिळवणी करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराला खतपाणी घालणार्यांशी हातमिळवणी करणे गांधी परिवाराला मान्य आहे का? हा मृत्यूचा खेळ राहुल गांधींना मान्य आहे का?, असे सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले.
#WATCH पश्चिम बंगाल में पंचायत चुनाव में जिस प्रकार से लोकतंत्र की हत्या होते हुए लोग देख रहे हैं, जहां लोकतांत्रिक अधिकारों को जताने के लिए लोगों को मौत के घाट उतारा जा रहा है। उसी तृणमूल के साथ कांग्रेस हाथ मिला रही है, क्या उनसे हाथ मिलाना मंज़ूर है उन्हें, जो पश्चिम बंगाल में… pic.twitter.com/UI8AOXK52W
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023
हेही वाचा :
- प.बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचाराचा भडका का उडाला? : ‘बीएसएफ’ने केला माेठा खुलासा
- Rainfall in NW & Delhi : यंदा उत्तर भारतात का पडतोय इतका पाऊस? जाणून घ्या कारण
- Old Pension Scheme : केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांचे ‘जुनी पेन्शन मिळण्याचे’ स्वप्न भंगले; सर्वोच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश