

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील कनिष्ठ न्यायालयांसह सर्वोच्च न्यायालयात मिळून ४ कोटी ३६ लाख २० हजार ८२७ खटले प्रलंबित आहेत. यातील सुमारे ४० टक्के खटले हे पोलिस, वकील आणि साक्षीदारांच्या दिरंगाईमुळे रखडलेले आहेत, असे डेटा ग्रीडच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.
वरील तिन्ही घटकांमुळे देशभरात तब्बल १,६९, ५३, ५२७ खटले रखडले आहेत. प्रलंबित खटल्यांमागील नेमक्या कारणांचा मागोवा घेऊन डेटा ग्रीडने एक अहवाल तयार केला आहे.