नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गत फेब्रुवारी महिन्याने उष्णतेचा विक्रम केला आहे. हवामान विभागाने 1900 पासून नोंदवलेल्या तापमानाच्या हिशेबाने गत फेब्रुवारी महिना आजवरचा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे. त्यापाठोपाठ भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल महिन्यानेही मागच्या 122 वर्षांतील सर्व एप्रिल महिन्यांतील उष्णतेचा विक्रम मोडला आहे. 1901 नंतर या वर्षीचा एप्रिल महिना सर्वात उष्ण एप्रिल ठरला आहे. मार्चमध्ये देशात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. गतवर्षी (2022) हवामानातील टोकाच्या स्थितीमुळे अनेक दुर्घटना झाल्या.
1) हरितगृह वायू आणि एल निनो यामुळे जगाचे तापमान वाढत असल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे.
2) विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील एल निनो विकसित झाल्यानंतर वर्षभरात जागतिक तापमानात वाढ होते.