Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण; समीर वानखेडेंची सीबीआय विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव
पुढारी ऑनलाइन डेस्क : Aryan Khan Drugs Case : सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सीबीआय ने केलेल्या कारवाई विरोधात एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी आज दुपारी 2:30 वाजता तातडीची सुनावणी घेतली जाणार आहे. आर्यन खानच्या प्रकरणी ही कारवाई बदलापोटी केली जात असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.
Former Zonal Director, NCB Mumbai Sameer Wankhede moves to Bombay High Court against CBI action against him; urgent hearing at 2:30 PM today.
In his petition, he claims that the action in the case of Aryan Khan is being taken out of revenge.
(File photo) pic.twitter.com/FGfrs072a6
— ANI (@ANI) May 19, 2023
आर्यनला वर्षी २ ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकलेल्या छाप्यानंतर अटक करण्यात आली होती. अटकेच्या २५ दिवसांनंतर त्यांला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास NCB मुंबईने केला होता. पण नंतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास SIT कडे देण्यात आला होता. SIT ने या प्रकरणाचा तपास वस्तुनिष्ठ पद्धतीने केला. या प्रकरणात एकूण 20 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यात आर्यन खान-अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा समावेश होता. या प्रकरणी आर्यन खानला 27 मे 2022 ला क्लिन चिट मिळाली.
दरम्यान, या कारवाईत आर्यन खान याला ठरवून टार्गेट करण्यात आले होते. तसेच एनसीबीचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खान याचे नाव प्रसिद्धीसाठी गोवले, असा आरोपही करण्यात आला होता. तसेच याच प्रकरणी समीर वानखेडे यांनी आर्य़न खान याला ड्रग्ज प्रकरणातून सोडविण्यासाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.
त्यानुसार समीर वानखेडे यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांवर प्रत्येकी 25 लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, याप्रकरणी 12 मे रोजी सीबीआयने दिल्ली, रांची आणि कानपूर येथे छापेमारी केली होती. त्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईच्या घरात सीबीआयने छापा टाकला होता.
सीबीआयच्या या कारवाई विरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. बदलापोटी ही कारवाई केली जात असल्याचा दावा याचिकेत केला आहे. याप्रकरणी आज दुपारी 2.30 वाजता तातडीची सुनावणी केली जाणार आहे.
हे ही वाचा :