२०१९ मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोदी यांच्या नावावरुन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, "देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे."
याप्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर निकालासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली होती. कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर त्यांनी केलेले ट्विट राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
हेही वाचा