पुढारी ऑनलाईन : केरळमधील कलियुत्तू उत्सवाच्या सजावटीसाठी रंगवण्यात येत असलेल्या वेल्लयानी भद्रकाली देवी मंदिराच्या संदर्भात केरळ न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मंदिर सजावटीसाठी कोणता रंग द्यावा हे प्रशासन ठरवू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पोलीस आणि प्रशासनाने मंदिराच्या रंगरंगोटी संदर्भात दिलेल्या आदेशाविरोधात मंदिर व्यवस्थापन मंडळाने केरळ उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.
याप्रकरणी दाखल दोन याचिकांवर केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोणत्याही मंदिराच्या कार्यक्रमात राजकीयदृष्ट्या तटस्थ राहून रंगांचा वापर केला जावा, असा दबाव जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना मंदिर प्रशासनावर आणता येणार नाही, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
केरळमधील कलियुत्तू उत्सवाच्या सजावटीसाठी मंदिराला केवळ भगवा रंग देण्यास परवानगी देता येणार नाही, असा आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. प्रशासनाच्या या आदेशाला त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मंदिराला कोणता रंग द्यावा, मंदिर प्रशासनाच्या वतीने निर्णय देत मंदिराची रंगरंगोटी, सजावट करताना प्रशासन किंवा पोलिस राजकीयदृष्ट्या तटस्थ रंगाचा वापर करण्याची सक्ती करू शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. .