Landslide : जोशीमठ पाठोपाठ उत्तरकाशी, ऋषिकेश, नैनिताल मसूरी येथेही भूस्खलनाचा धोका | पुढारी

Landslide : जोशीमठ पाठोपाठ उत्तरकाशी, ऋषिकेश, नैनिताल मसूरी येथेही भूस्खलनाचा धोका

पुढारी ऑनलाइन डेस्क : जोशीमठमध्ये झालेल्या भूस्खलनाचे (Landslide) लोन आता उत्तराखंडातील उत्तरकाशी, ऋषिकेश, नैनिताल मसूरी तसेच अन्य हिमालयन राज्यांमध्ये पसरत चालले आहे. जोशीमठचे संकट ही फक्त मोठ्या धोक्याची घंटा आहे. उत्तराखंडमधील इतर अनेक डोंगरी शहरांमध्ये, तेथील रहिवाशांनी इमारती आणि रस्त्यांना भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, त्यांच्या टीमने या क्षेत्राला भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी या भागातील अनेक स्थानिक रहिवाशांशी तसेच काही स्थानिक अधिका-यांशी संवाद साधला. त्याआधारे टीओआयने ही माहिती दिली आहे. टीओआयने म्हटले आहे की, अनेक घरांना भेगा पडल्याचे (Landslide) आढळले. हे राहण्यायोग्य नसल्याने डझनभर कुटुंबांना नगरपरिषदेच्या ‘रेन बसेरा’मध्ये अनेक रात्री घालवाव्या लागल्या आहेत.

जोशीमठमधील संकट वाढले तेव्हा 520 मेगावॉटच्या तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असलेल्या टनेलमध्ये जलवाहिनी फुटल्यानंतर शहरातील इमारतींना तडे गेले. (Landslide) त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी कारवाईची मागणी केली. कर्णप्रयाग, उत्तरकाशी, गुप्तकाशी, ऋषिकेश, नैनिताल आणि मसुरी या हिमालयीन राज्यातील इतर अनेक ठिकाणी कोसळलेल्या इमारतींचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत, असे टीओआयने म्हटले आहे.

जोशीमठपासून सुमारे 80 किमी असणा-या कर्णप्रयागमध्ये केंद्राकडून ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लाईन आणि चार धाम ऑलवेदर रोडसाठी काम सुरू आहे. हा केंद्राचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे दोन्ही मोठे प्रकल्प गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ या चार धाम देवस्थानांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणच्या स्थानिकांना जोशीमठ सारखीच भीती वाटत आहे. (Landslide)

कर्णप्रयाग तहसीलदार सुरेंद्र देव यांच्या मते, सीएमपी बेंड, आयटीआय कॉलनी आणि बहुगुणा नगर हे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहेत. बद्रीनाथ महामार्गावर वसलेल्या बहुगुणा नगरमधील दोन डझनहून अधिक घरांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. (Landslide)

अलकनंदा आणि पिंडार नद्यांच्या संगमावर वसलेल्या कर्णप्रयाग या शहरात “उघड बांधकाम, चार धाम रस्ता प्रकल्पासाठी डोंगर कापण्याचे काम आणि लोकसंख्येच्या दबावामुळे आधीच कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे” असा दावा येथील स्थानिकांनी केला आहे.

1975 पासून शहरात राहत असलेले निवृत्त लष्करी जवान गब्बर सिंग रावत (वय 85) म्हणाले, “माझे घर कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्याला आधार देणारे स्तंभ वाकायला लागले आहेत. गतवर्षी पाऊस पडल्यानंतर ही समस्या अधिकच बिकट झाली. आम्हाला भीती वाटते की ही इमारत आणखी पावसाळ्यात टिकणार नाही.”

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वेप्रकल्पामुळे धोका (Landslide)

ऋषिकेशच्या अटाली गावात किमान 85 घरांना तडे गेले आहेत. येथील स्थानिकांनी दावा केल आहे की ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाचा एक भाग म्हणून सुरू असलेल्या रेल्वे बोगद्याच्या कामामुळे हे घडले. गावकऱ्यांनी सांगितले की, जवळपास सर्व घरांमध्ये आणि शेतीच्या शेतात भेगा पडल्या आहेत.

टिहरी गढवाल हे आणखी एक क्षेत्र आहे जिथे भेगा आणि जमीन कमी झाल्याची तक्रार आहे, विशेषत: चंबाच्या लहान गावात आणि आसपासच्या भागात या भेगा पडल्या आहेत. भूस्खलनाच्या (Landslide) भीतीने रहिवाशांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. चार धाम रस्ता प्रकल्पासाठी बांधण्यात येत असलेल्या ४४० मीटर लांबीच्या बोगद्याजवळ बहुतेक बाधित घरे चंबा मुख्य बाजार परिसरात आहेत.

टिहरी गढवालचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ब्रिजेश भट्ट म्हणाले, “बोगद्याच्या बांधकामाच्या जागेजवळ असलेल्या सुमारे अर्धा डझन घरांना भेगा पडल्या आहेत. गेल्या वर्षी ही समस्या पहिल्यांदा समोर आली.

एक शतकाहून अधिक जुन्या असलेल्या मसुरीच्या लांदूर बाजारात रस्त्याचा एक भाग “हळूहळू बुडत आहे” आणि रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, रूंद होत जाणार्‍या भेगा पडल्या आहेत. (Landslide) बाधित भागात 12 दुकाने आहेत ज्यांच्या वर आणि खाली निवासस्थाने आहेत आणि सध्या तेथे राहणाऱ्या सुमारे 500 लोकांना धोका असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

त्याचप्रमाणे, 2018 मध्ये नैनितालमधील लोअर मॉल रोडमध्ये भेगा पडल्या होत्या आणि रस्त्याचा काही भाग नैनी तलावात बुडाला होता. या मार्गावरील पॅचचे काम करण्यात आले असले तरी पुन्हा खड्डे पडले असून रस्त्याचा काही भाग पुन्हा बुडू लागला (Landslide) आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मॉल रोडवरील वाहतुकीचा वाढता ताण यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

रुद्रप्रयागच्या अगस्त्यमुनी ब्लॉकमधील झालीमठ बस्तीमधील डझनहून अधिक कुटुंबांच्या घरांना तडे गेल्याने ते विस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. केदारनाथचे प्रवेशद्वार असलेल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गुप्तकाशी शहरानेही काही भागात ‘बुडण्याची’ (Landslide) नोंद केली आहे. अल्मोडा येथे विवेकानंद पार्वतीया कृषी संशोधन संस्थेजवळ जमीन खचल्याचा मुद्दा समोर आला आहे. संस्थेचे संचालक लक्ष्मीकांत म्हणाले, “लगतच्या रस्त्यावर जमीन खचल्याने संस्थेची इमारत पाडावी लागली…. आजूबाजूची जमीन गेल्या 15 वर्षांपासून बुडत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुरेशा नियोजनाशिवाय हाती घेतलेले मोठे बांधकाम प्रकल्प, लोकसंख्या वाढ, पर्यटकांचा भार आणि वाहनांचा ताण यांमुळे उत्तराखंडमधील डोंगरी शहरांना (Landslide) त्रास होत आहे.

ज्येष्ठ पर्यावरणवादी अनिल जोशी, पद्मभूषण पुरस्कार विजेते, जे डेहराडून स्थित हिमालयन पर्यावरण अभ्यास आणि संवर्धन संस्थेचे संस्थापक आहेत, ते म्हणाले, “संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे, जोशीमठ (Landslide) प्रकरण माझ्यासाठी धक्कादायक नाही. 1976 मध्ये या प्रकरणाची दखल घेण्यात आली होती, परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही. हीच वेळ आहे की आपण आपल्या डोंगरी शहरांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे आणि पुढील बिघाड टाळण्यासाठी त्वरित पावले उचलावीत.”

हे ही वाचा :

Australian Open | सानिया मिर्झाचा ग्रँडस्लॅम प्रवास थांबला! मुलासमोर खेळली ऑस्ट्रेलियन ओपन फायनल, अश्रू अनावर (Video)

Budget & Halwa : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी का केला जातो ‘गाजर हलवा’? जाणून घ्‍या…

हैदराबाद विद्यापीठात ABVP नं दाखवला ‘द काश्मीर फाइल्स’, बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीला विरोध

Back to top button