नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता सर्वात खराब आहे. 2022 मध्ये दिल्ली भारतातील सर्वात प्रदूषित शहर (Delhi Pollution) होते. दिल्लीत पीएम २.५ पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान, 2022 च्या सप्टेंबरमध्ये, सरकारने 2026 पर्यंत कणांच्या घनतेत 40 टक्के घट करण्याचे नवीन लक्ष्य ठेवले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार दिल्लीत पीएम २.५ पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट (Delhi Pollution) होती. गाझियाबाद (217.57 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) हे पीएम 10 पातळीच्या दृष्टीने देशातील सर्वात प्रदूषित शहर होते. यानंतर फरिदाबाद आणि त्यानंतर दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे. पीएम 2.5 आणि पीएम 10 साठी देशाची सध्याची वार्षिक सरासरी सुरक्षित मर्यादा अनुक्रमे 40 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आणि 60 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे.
राष्ट्रीय राजधानीतील पीएम २.५ प्रदूषण चार वर्षांत ७ टक्क्यांनी कमी झाले आहे, असे NCAP ट्रॅकर अहवालात म्हटले आहे. 2019 मध्ये ते 108 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरवरून 2022 मध्ये 99.71 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके वाढले.
NCAP ट्रॅकर हा न्यूज पोर्टल कार्बन कॉपी आणि महाराष्ट्रस्थित स्टार्ट-अप 'रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस' यांचा संयुक्त प्रकल्प आहे. भारताच्या स्वच्छ आणि शुद्ध हवेच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?