नवी दिल्ली- पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि खात्यांमधील 9.79 लाख पदे रिक्त असल्याचे जितेंद्र सिंग यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंत्रालये आणि खात्यातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून आगामी काळात आणखी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत, असेही सिंग यांनी नमूद केले.
तेलंगणा, मेघालयसहित नऊ राज्यांनी सीबीआय तपासासाठीची सर्वसाधारण संमती रद्द केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
दिल्ली स्पेशल पोलिस इस्टब्लिशमेंट कायदा 1946 नुसार कोणत्याही गुन्ह्याच्या तपासासाठी सीबीआयला संबंधित राज्याची आधी परवानगी घ्यावी लागते. मात्र 9 सध्या राज्यांनी ही संमती रद्द केलेली आहे, असे सिंग यांनी नमूद केले. ज्या राज्यांनी सीबीआय तपासासाठीची संमती रद्द केलेली आहे, त्यात तेलंगणा, मेघालय, छत्तीसगड, झारखंड, केरळ, मिझोराम, पंजाब, राजस्थान आणि प. बंगाल यांचा समावेश आहे.