जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात भीषण अग्नितांडव, 20 घरे जळून खाक
पुढारी ऑनलाइन डेस्क : जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात चुग गांधारी गावात आज शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत जवळपास 15 ते 20 घरे जळून खाक झाली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही काही घरांमध्ये अग्नितांडव सुरू आहे. तर फायर ब्रिगेडची गाडी वेळीच घटनास्थळी पोहोचली नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे आतापर्यंतचे वृत्त आहे.
J&K | 8-10 houses gutted in a fire late last night in Chagg village of Gandhari area in Kishtwar. No loss of lives reported: SDM Paddar Dr Rishi Kumar Sharma pic.twitter.com/ZdU2VAinkn
— ANI (@ANI) October 28, 2022
हे ही वाचा :
T20 World Cup 2022 | पावसामुळे मेलबर्नमधील अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना रद्द