भारत जोडो यात्रा: राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल; भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार कर्नाटकात
पुढारी ऑनलाईन डेस्क: कर्नाटकातील मंड्या येथून गुरुवारी दोन दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असून सोनिया गांधीही या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. राहुल गांधी सुरुवातीपासूनच भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत असून प्रत्येक संधीवर ते भाजपवर निशाणा साधत आहेत. ते म्हणाले, “कर्नाटकात सर्वात भ्रष्ट सरकार असून ते प्रत्येक गोष्टीवर शेतकरी, मजुरांकडून 40% कमिशन घेते.”
‘पंतप्रधानांनी कोणतीही कारवाई केली नाही’
ते पुढे म्हणाले, ठेकेदाराने पत्र लिहून भ्रष्टाचार सुरू असल्याचे सांगूनही पंतप्रधानांनी कोणतीही कारवाई केली नाही. संपूर्ण भारतात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात लढा देणे हे या यात्रेचे ध्येय आहे. कन्याकुमारी ते काश्मीर या यात्रेचे मी स्वागत करीन आणि या प्रवासात माझ्या मागे येणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानेन.
Karnataka | The response we have garnered from a BJP-ruled state in Karnataka shows that the countdown for BJP's fall in the next election has begun: Congress MP Jairam Ramesh at the 'Bharat Jodo Yatra' pic.twitter.com/meTktrMs1J
— ANI (@ANI) October 6, 2022
काय म्हणाले जयराम रमेश?
काँग्रेसचे खासदार जयराम रमेश म्हणाले की, कर्नाटकातील भाजपशासित राज्यातून आम्हाला मिळालेल्या प्रतिसादावरून पुढील निवडणुकीत भाजपच्या पडझडीची उलटी गिनती सुरू झाल्याचे दिसून येते.
भाजपचे दुकान होणार बंद
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री डीके शिवकुमार यांनी यावेळी सांगितले की, दसऱ्यानंतर आता राज्यात काँग्रेसचा विजय होईल. राज्यात आमची सत्ता येत असून भाजपची दुकानदारी बंद होणार असल्याचे ते म्हणाले. सोनिया गांधी राज्याच्या रस्त्यावर आल्याचा आम्हाला अभिमान आहे.