सणासुदीच्या काळात प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर रेल्वेच्या VIKALP योजनेबद्दल जाणून घ्या?

सणासुदीच्या काळात प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर रेल्वेच्या VIKALP योजनेबद्दल जाणून घ्या?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: एक काळ असा होता कि प्रवाशांना रेल्वे आरक्षणासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत होते, परंतु बदलत्या काळानुसार रेल्वे आरक्षणाच्या पद्धतीमध्ये मोठे बदल झाले आहेत. आता तुम्ही घरबसल्या IRCTC द्वारे तिकीट सहज बुक करू शकता. तुम्ही तिकीट काउंटरवरून वेटिंग तिकीट बुक केले असल्यास, ते कन्फर्म असो किंवा नसो,तरीही तुम्ही प्रवास करू शकता, परंतु ऑनलाइन वेटिंग तिकीट कन्फर्म नसल्यास ते रद्द करून तिकिटाचे पैशे परत केले जाते.

अशा स्थितीत प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सणासुदीचा काळ सुरू असतानाही प्रवाशांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विकल्पयोजना सुरू केली आहे. याद्वारे तुम्ही ऑनलाइन वेटिंग तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वेचे वेगवेगळे पर्याय निवडून कन्फर्म तिकिटावर प्रवास करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात VIKALP योजनेबद्दल

विकल्प योजना आहेत तरी काय?
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी VIKALP योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन वेटिंग तिकीट खरेदी करण्याचे वेगवेगळे रेल्वे पर्याय निवडून कन्फर्म तिकिटावर प्रवास करू शकता. रेल्वेने पर्यायी ट्रेन निवास योजना (ATAS) ला VIKALP योजना असे नाव दिले आहे. या योजनेद्वारे प्रवाशांना जास्तीत जास्त कन्फर्म तिकिटे देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते.

ऑनलाइन बुक करण्याची पद्धत?
तुम्ही वेटिंग तिकीट ऑनलाइन बुक करत असताना, बुकिंग करताना तुम्हाला VIKALP पर्याय भरण्यास सांगितले जाते. या पर्यायामध्ये, तुम्हाला ज्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट मिळाले आहे त्या ट्रेनशिवाय इतर ट्रेन निवडण्यास सांगितले जाते. याचा अर्थ तुम्ही बुक केलेले तिकीट जर कन्फर्म नसेल तर तुम्हाला दुसऱ्या निवडलेल्या ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळेल. बुक केलेल्या तिकिटाच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही हा पर्याय तपासू शकता.

VIKALP योजनेत तुम्ही 7 ट्रेन निवडू शकता,
VIKALP योजना निवडताना तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल असे गृहीत धरू नये. तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल की नाही हे ट्रेनमधील सीटच्या उपलब्धतेवर पूर्णपणे अवलंबून असते, पण निश्चितपणे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. VIKALP योजनेअंतर्गत, तुम्हाला एकूण 7 ट्रेनचा पर्याय निवडण्याची संधी मिळते. ही ट्रेन बोर्डिंग स्टेशनपासून गंतव्यस्थानापर्यंत 30 मिनिटे ते 72 तासांत धावली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news