दिल्लीतील आप सरकारने जिंकला बहुमत प्रस्ताव : ‘ऑपरेशन लोटस‘ अपयशी केजरीवालांची टीका | पुढारी

दिल्लीतील आप सरकारने जिंकला बहुमत प्रस्ताव : ‘ऑपरेशन लोटस‘ अपयशी केजरीवालांची टीका

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आज आम आदमी पक्षाने विधानसभेत बहुमत प्रस्ताव जिंकला. या प्रस्तावाच्या बाजुने 58 मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. बहुमत प्रस्ताव जिंकल्यानंतर भाजपचे ‘ऑपरेशन लोटस‘ अपयशी ठरले असल्याची टीका केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

देशातील 8 ते 10 विरोधी सरकारांवर भाजपची नजर आहे. या सरकारांमधील आमदारांना वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत. दिल्लीतही अशा आॅफर्स देण्यात आल्या होत्या, मात्र दिल्लीत भाजपवाले एकाही आमदाराला खरेदी करु शकले नाहीत. आमच्या बाजुने 62 आमदार आहेत. दोन विदेशात असून एक तुरुंगात आहे. अशा स्थितीत आमच्या बाजुने 58 मते पडली आहेत, असे केजरीवाल यांनी नमूद केले.

दरम्यान उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांचे केजरीवाल यांनी जोरदार समर्थन केले आहे. शिसोदिया यांनी भ्रष्टाचार केला असता तर त्यांच्या घरी पैसा सापडला असता, असे सांगून केजरीवाल पुढे म्हणाले की, सीबीआयने व्यापक प्रमाणात छापेमारी करुनही त्यांना काही सापडलेले नाही. भाजपने शिसोदिया यांना प्रताडित करण्यासाठी तपास संस्थांचा गैरवापर चालवला आहे. आमदारांना खरेदी करण्याची पध्दत भाजपने बंद केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. याशिवाय पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी कराव्यात आणि शेतकरी, विद्याथ्र्यांचे कर्ज कमी केले जावे, याही आमच्या मागण्या आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button