घटस्फोटित जोडीदाराला 'अतिथी देवो भव' वृत्तीने वागवा: मद्रास उच्च न्यायालय
पुढारी ऑनलाईन: घटस्फोटित जोडप्यामधील मुलाच्या भेटीच्या अधिकारांशी संबंधित प्रकरण हाताळताना, मद्रास उच्च न्यायालयाने यावर जोर दिला की विभक्त झालेल्या जोडीदारांनी मुलासमोर एकमेकांशी दयाळूपणे आणि सहानुभूतीने वागले पाहिजे. न्यायमूर्ती कृष्णन रामासामी यांनी हे निरीक्षण नोंदवताना म्हटले आहे की, पती-पत्नी मुलांना भेटायला आल्यावर वाईट वागणूक दिल्याच्या अनेक घटना त्यांच्यासमोर आल्या आहेत. “व्यक्तिगत उदासीनतेमुळे जोडीदाराने आपल्या जोडीदाराशी पत्नी/पती म्हणून नाही तर किमान पाहुण्यासारखा आदर देऊन वागावे कारण आपल्या चालीरीती आणि प्रथेमध्ये पाहुण्याला “अतिथी म्हणजे देव” असे मानले जाते.
न्यायालयाचे मत होते की, जो पालक एखाद्या मुलाला दुसऱ्या पालकाचा द्वेष किंवा भीती बाळगण्यास शिकवतो तो त्या मुलाच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी गंभीर आणि सतत धोका निर्माण करत असतो. “प्रत्येक मुलाला दोन्ही पालकांसोबत सुरक्षित आणि प्रेमळ नातेसंबंध असण्याचा अधिकार आणि त्याची गरज आहे. पुरेशा कारणांशिवाय पालकांकडून मुलांना या अधिकारापासून वंचित ठेवणे म्हणजेच बाल शोषणाचा एक प्रकार आहे. द्वेष ही अशी भावना नाही जी नैसर्गिकरित्या येते. बहुतेक मुलांना ते शिकवावी लागते.”
न्यायमूर्ती रामासामी यांनी या प्रकरणात हे निरीक्षण नोंदवले की, मुलाच्या वडिलांना आठवड्यातून निर्धारित वेळेसाठी अल्पवयीन मुलाला त्याच्या निवासस्थानी नेण्याची परवानगी होती. तथापि, पत्नीने असे करण्यास असमर्थता दर्शवली आणि त्यात बदल करण्याची मागणी केली. कोर्टाने आपल्या आदेशात बदल करून वडिलांना दर शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी मुलाला आईच्या घरी भेटण्याची परवानगी दिली.
पती-पत्नींनी कोणत्याही अडथळ्यांशिवाय या आदेशांचे पालन करावे आणि मुलांना पालकांसोबत वेळ घालवण्यास मन वळवावे. ” मुलाचा ताबा असलेल्या जोडीदाराच्या बाजूने अपयश आल्यास, तो किंवा तिला आदेशाचे पालन न करण्यासाठी जबाबदार धरले जाईल आणि शेवटी, तो किंवा ती मुलाचा ताबा राखण्यास असमर्थ आहे असे मानले जाईल.
प्रत्येक मुलाला दोन्ही पालकांचा सहवास, प्रेम आणि आपुलकी मिळवण्याचा अधिकार आहे. हे लक्षात घेऊन “पती-पत्नीमध्ये कितीही मतभेद असले, तरी मुलाचा एकमेकांवर हक्क असेल. त्यामुळे मुलाला दोन्ही पालकांचा सहवास नाकारता येणार नाही.” 29 जुलै रोजी पुढील सुनावणीसाठी हे प्रकरण सूचीबद्ध करताना, न्यायालयाने पत्नीला पतीसाठी नाश्ता आणि रात्रीचे जेवण देऊन पाहुणचार दाखवावा आणि मुलासह तेच खावे असे निर्देश दिले.” म्हणजे पती, पत्नी आणि मुले एकत्रित येऊन निरोगी वातावरण तयार करा जेणेकरुन मुलाला आनंद वाटेल”