राज ठाकरेंनी आधी माफी मागावी, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवावा : भाजप खासदार बृजभूषण मागणीवर ठाम
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज ठाकरेंनी आधी माफी मागावी; त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवावा, असा पुन्नरुच्चार उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांन आज केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून राेजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला कैसरगंज मतदारसंघातील भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी कडाडून विरोध केला आहे. आज दिल्ली येथील पत्रकार परिषदेत घेत त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
बृजभूषण यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात ‘चलो अयोध्या’ अशी हाक दिली आहे. राज ठाकरेंची ही धार्मिक यात्रा नाही तर राजकीय यात्रा आहे. तुम्हाला देशाचे नेते व्हायचे असेल तर खुशाल व्हा ; पण आधी उत्तर प्रदेशमधील नागरिकांची माफी मागा. असे आवाहन करत राज ठाकरेंना आम्ही रोखणार, असा इशारा त्यांनी दिला.
2008 मध्ये उत्तर प्रदेशातील तरूणाला मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत मारहाण केली होती. ताे या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यावेळी त्या तरूणाच्या पाठीवरील मारहाणीचे निशाण दाखविण्यात आले. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमधील नागरिकांचा अपमान केला आहे. त्यांना माफी मागावीच लागेल, अशी आग्रही मागणी बृजभूषण यांनी केली.
चर्चा तर होणारचं…! पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यानं लढवली अनाेखी शक्कल https://t.co/fZwYLSm8du#farm #idea
— Pudhari (@pudharionline) May 17, 2022
हेही वाचा