साध्वी ऋतंभरा : ‘हिंदू राष्ट्रासाठी ४ मुलं जन्माला घाला, त्यातली २ आरएसएसच्या हवाली करा’ | पुढारी

साध्वी ऋतंभरा : 'हिंदू राष्ट्रासाठी ४ मुलं जन्माला घाला, त्यातली २ आरएसएसच्या हवाली करा'

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये रामनवमीपासून ते हनुमान जयंतीपर्यंत सामाजिक वातावरण तणावपूर्ण आहे. अजानचा वाद आणि हनुमान जयंती मिरवणुकीतील हाणामारीमुळे राज्यातील जातीय सलोखा दुखावला गेला आहे. दरम्यान, राम महोत्सव नावाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या साध्वी ऋतंभरा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

त्यांनी हिंदूंना दोन नव्हे तर चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. राज्यातील कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे रामोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी साध्वी ऋतंभरा आल्या होत्या. कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, प्रत्येक हिंदूने दोन मुलांच्या विचारातून बाहेर आले पाहिजे.

प्रत्येक हिंदूला आता चार मुले झाली पाहिजेत. यातील दोन मुले कुटुंबासाठी आणि उरलेली दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) यांच्याकडे सोपवली जावी जेणेकरून ते राष्ट्रीय बलिदानात योगदान देऊ शकतील. ते पुढे म्हणाले की, आपल्यासाठी राष्ट्र हे सर्वोत्कृष्ट असले पाहिजे.

हे ही वाचलं का ?

Back to top button