दिल्लीत अग्नितांडव : सात जणांचा होरपळून अंत, ३० झोपड्या आगीत भस्मसात
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील गोकलपुरी पोलिस ठाणे परिसरातील गोकलपुरी गावात शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत ३० झोपड्या भस्मसात झाल्या. या भीषण दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
AAP’s Punjab winners : ‘आप’चे १२ डॉक्टर, ७ वकील, आरटीआय कार्येकर्ते पंजाब विधानसभेत
शुक्रवारी मध्यरात्री एका झोपडीला आग लागली. काही क्षणात ३० हून अधिक झोपड्यांना आगीने आपल्या कवेत घेतले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे १३ बंब आले. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३० झोपड्या आगीत भस्मसात झाल्या.
#UPDATE | Delhi: A forensics team conducts tests at the spot in Gokulpuri area where a fire broke out in shanties last night, claiming seven lives. pic.twitter.com/nMzZd5cK7e
— ANI (@ANI) March 12, 2022
हेही वाचलं का?
- IND vs SL 2nd TEST : एकाच सामन्यात दोन विक्रमांना गवसणी घालण्याची जडेजाला संधी
- Supreme Court : ती एक पुरुष आहे! पतीची पत्नीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, फसवणूक केल्याचा दावा
- ओबीसी राजकीय आरक्षण : ओबीसींना मोठा दिलासा; निवडणुका 6 महिने लांबणीवर