

इंफाळ : वृत्तसंस्था : उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा या राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली असताना भाजपने मणिपूरमध्येही विधानसभा निवडणूकी 32 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपशी थेट सामना असलेल्या काँग्रेसचा धुरळा उडाला आहे. मणिपूरमध्ये बहुमतासाठी 31 जागांची गरज आहे.
राज्यात भाजपला जोरदार टक्कर देण्याची भाषा करणार्या काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपने मणिपूरमध्ये सत्ता हस्तगत केली असून भाजपने देशाच्या ईशान्य राज्यातही पुन्हा कमळ फुलवण्याची किमया साधली आहे.
मणिपूरमध्ये एनडीएप्रणित भाजपचे सरकार होते. यंदाही भाजपचेच सरकार मणिपूरमध्ये येत असल्याचे चित्र होते आणि ते भाजपने साध्यही करून दाखवले. भाजपचा थेट सामना असलेल्या काँग्रेसची खूपच वाईट अवस्था झाली आहे.