

धोरणात्मक निर्णयाची गरज
अन्याय अत्याचार या सगळ्यांमध्ये मराठवाड्यातील जनता चिरडून भरडून निघत होती. आणि ह्याच वेळेस जो एक अमोघ स्वातंत्र्यलढा लढला गेला जो इतिहासात दुर्लक्षित राहिला गेला. राजकारणात दुर्लक्षित राहिला गेला. भारताच्या एकूण इतिहासातच दुर्लक्षित राहिलेला एक सर्वकषपणे जनतेने लढलेला लढा म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम होय .खऱ्या अर्थाने मराठवाडा हा सुजलम सुफलम व्हायला पाहिजे होता. विकासाचे वारे मराठवाड्यात वाहिले पाहिजे होते. मात्र आजही मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते हे दुर्दैव आहे. विकासात्मक धोरणाची गरज मराठवाड्याला आहे.– जयंत पाटील, अभ्यासक, पैठणमाझे आजोबा भाऊराव तात्याराव कानडे चांगतपुरीतून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. त्यांची लढ्यात महत्त्वाची भूमिका होती. निजाम त्यांच्या पाठीमागे दबा धरूनच होते १९४७ ला त्यांना गाठून क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. त्यांनी हौतात्म्य पत्करले. पैठण शहरात १९८२ ला स्वातंत्र्य लढ्याच्या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. मात्र, आज या स्मारकाची दूरवस्था झाली आहे. शासनाने आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला आजपर्यंत सवलती दिलेल्या नाहीत. शासनाने स्वातंत्रयसैनिकांच्या पाल्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे .– सुधीर कानडे, पैठण